चातुर्मास १४ – श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १९०४, शके १८२६

पूर्वी ठरविल्याप्रमाणे या चातुर्मासात आषाढ पौर्णिमेपासून महाराजांनी मौन धारण केले. पुराणसुद्धा बंद होते. विशेष काही सांगणे असल्यास पाटीवर लिहून दाखवीत. बहुतेक सर्व काळ समाधीतच जात असे. दोन-तीन दिवसांनी केव्हा तरी भिक्षा होत असे. गोपाळराव राजाध्यक्ष यांनी गुरुचरित्रातील कथानकांवर किर्तनोपयोगी अशी व्याख्याने तयार केली व ती महाराजांना वाचून दाखविली. महाराजांनी ‘नारायण’ एवढेच शब्द उच्चारून समाधान दर्शविले.

हुशंगाबादेहून हळूहळू प्रवास करीत एके दिवशी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास महाराजांची स्वारी नरसोबावाडीस येऊन दाखल झाली. बरोबर फक्त दोन छाट्या, दंड, भोपळ्याचा कमंडलू व उपनिषदांची एक लहान पोथी इतके सामान होते. महाराज इतक्या लवकर येतील अशी कल्पना वाडीच्या मंडळींना नसल्यामुळे ती मंडळी स्वस्थ होती. महाराज एकदम श्रीदत्तपादुकांसमोर येऊन उभे राहिले. ‘नमो ब्रह्मदेवा’ हे पद म्हणून प्रार्थना केली व वंदन करून वरती श्रीनारायणस्वामींचे समाधीचे दर्शन घेऊन स्वामी ब्रह्मानंदाचे माडीवर जाऊन बसले.

दुसरे दिवसापासून महाराजांचा उपदेश करण्याचा नित्यक्रम सुरू झाला. पहाटे चार वाजता उठून काही योगप्रक्रिया सांगत. नंतर सूर्योदयाचे पूर्वी शौचमुखमर्जनादि उरकून स्नान होत असे. नित्यकर्मे आटोपल्यावर खाली देवदर्शन करून वर मठात परत येत. नंतर कित्येकांना संध्यादि ब्रह्मकर्माचे शिक्षण देऊन कित्येकांना उपनिषदे सांगत. मध्यान्हकाळचे आन्हिक आटोपल्यावर तीनपासून सात घरातून भिक्षा घ्यावयाची. सर्वच प्रेमीमंडळी त्यामुळे क्रमाक्रमाने भिक्षेस जात असत, भिक्षा झाल्यावर ज्योतिष, वैद्यक, मंत्र, तंत्र इत्यादि विषयांचे प्रश्न पुढे येत. त्यांना सर्वांना व्यवस्थित सांगणे होत असे.

महाराजांनी दीक्षितस्वामीजींना दंड दिला व त्यांचे नाव ‘नृसिंहसरस्वती’ असे ठेवले. हे महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते. मितभाषी, शांत, दांत, एकांतप्रिय असे होते. स्वभाव अत्यंत प्रेमळ होता. महाराजांचे आज्ञेप्रमाणे वाडीतच श्रीदत्तपूजा, उत्सवादि कार्य करीत दीक्षितस्वामीजी पुष्कळ वर्षे राहिले होते.

सखारामबापू गेंडे म्हणून एक पुजारी वाडीत आहेत. त्यांना पूर्वी सर्वत्र विटाळ आहे असा भास होत असे. त्यांचे उत्पन्नही तंट्यामुळे त्यांना मिळत नसे. महाराजांनी त्यांना ‘दत्तमाला मंत्राचा जप’ करण्याबद्दल पत्राने कळविले होते. त्याप्रमाणे त्यांनी श्रद्धेने अनुष्ठान करताच तो सर्व भार दूर होऊन उत्पन्नही कुळांकडून वेळोवेळी मिळू लागले.

पहाटे उठून महाराज पंचगंगेवर जाऊन स्नान करून आले. नित्यकर्म झाल्यावर जिज्ञासू मंडळींना उपनिषदे सांगितली. भिक्षा झाल्यावर आलेल्या आर्त लोकांना पीडानिवारणार्थ योग्य ते उपाय सांगण्यातच संध्याकाळ होत असे. वाडीतील दादो नारायण पुजारी यांची पत्नीचे अंगांतील पिशाच्च शिरोळास गेले. मिरजेकडून येणेविषयी मिरज मळेकरीणबाईंनी अनुग्रह केला. पण त्यांना आज काही सांगता येत नाही असे उत्तर मिळाले. वाडीला येणारी मंडळी येथेही येत. त्यामुळे येथेही बरीच यात्रा जमत असे. वाडीतील बऱ्याच मंडळींनी येथे आग्रह घेतला.

Leave a Reply

17 − 12 =